सांगोला तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचाआ.गणपतराव देशमुख यांना पाठींबा - सुरजदादा बनसोडे

सांगोला तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा                                                                       
.गणपतराव देशमुख यांना पाठींबा - सुरजदादा बनसोडे
जुनोनी (वार्ताहर) :- सांगोला तालुका रिपब्लिकन पार्टीऑफ इंडिया आठवले गटाने सांगोला विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आ.गणपतराव देशमुख यांना यानिवडणुकीमध्ये पाठींबा दिला असून रिपाईच्याकार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये आ.गणपतराव देशमुखयांच्यासाठी कार्य करून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयीकरण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती रिपाई आठवलेगटाचे तालुकाध्यक्ष सुरजदादा बनसोडे यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृतशेतकरी कामगार पक्षाचे अधिकृतउमेदवार आ.गणपतराव देशमुखयांच्या प्रचारार्थ जुनोनी येथे कालरविवारी सायंकाळी आयोजितकेलेल्या प्रचारसभेत सुरजदादाबनसोडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ.गणपतराव देशमुख, श्री.बाबुराव गायकवाड,सभापती सौ.सुरेखा सुर्यगण, गजेंद्र कोळेकर, प्रा.लक्ष्मण हाके,चंद्रकांतदादा देशमुख, ऍड.सचिन देशमुख, किसनपंच कोळेकर आदीमान्यवर उपस्थित होते.पक्षाच्या वरिष्ठांशी त्याचप्रमाणे तालुका पातळीवरील प्रमुखपदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आ.देशमुख यांना पाठिंबादेण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून सुरजदादा बनसोडे म्हणाले,सांगोला तालुक्यातील गोरगरीब जनता, मुस्लीम,भटका-विमुक्त,दिनदलित, शेतकरी-शेतमजूर हा सुखाने व एैटीत चार घास खातोयाचे सर्व श्रेय आ.गणपतराव देशमुख यांनाच द्यावे लागेल. 50 वर्षेआमदार राहणे हा काय जोक नाही. तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारच्यागुंडगिरीला, दडपशाहीला त्यांनी थारा दिला नाही. तालुक्यामध्ये शांतताव सुव्यवस्था उत्तम प्रकारे ठेवण्यामध्ये आ.देशमुख यांचा सिंहाचावाटा आहे. उद्याची निवडणुक ही तालुक्यातील उपेक्षित घटकांसाठीमहत्त्वाची आहे. उपेक्षित घटकांसाठी तालुक्यामध्ये सामाजिक सुरक्षाव शांतता महत्त्वाची आहे. या गोष्टीची जाणीव ठेऊन रिपाई आठवलेगटाने आ.देशमुख यांना पाठींबा दिला आहे. कार्यकर्त्यांनी गहाळ नराहता आ.देशमुख यांच्यासाठी कार्य करावे, असे आवाहनही शेवटीत्यांनी केले.राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते श्री.बाबुराव गायकवाड यावेळी म्हणाले,आ.गणपतराव देशमुख आणि शेतकरी कामगार पक्षाने मागच्या दोनलोकसभेच्या निवडणुकीत, विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्याचप्रमाणेजिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोलाचे योगदान दिलेआहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे विकासाचे साधन आहे. दुष्काळीपरिस्थितीमध्ये राष्ट्रवादी व शेकाप कार्यकर्त्यांनी तालुक्यात छावण्याकाढून पशुधन वाचविले आहे. आठवड्यातून एकदा टंचाई अढावाबैठक घेऊन शेतकर्‍यांना दिलासा देण्याचे काम केले आहे.आठवड्याला होणारी ही बैठक सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी खुलीअसताना देखील इतर पक्षाचे नेते मंडळी या बैठकीला कधी हजरराहिले नाही. खा.शरदराव पवार यांचा मी सच्चा कार्यकर्ता असूनत्यांचा आदेश मानून तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला राष्ट्रवादीपक्षाने जाहीर पाठींबा देऊन त्यांना विक्रमी मताने निवडून आणण्याचापक्षातील जेष्ठ नेते, कार्यकर्ते, आ.दिपकआबा यांनी निर्धार केला आहे.समाजाच्या हिताचे राजकारण करणार्‍या आ.गणपतराव देशमुख यांचाघरोघरी जावून गाडीचा प्रचार करावा व त्यांना विक्रमी मताधिक्यानेविजयी करावे, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.यावेळी आ.गणपतराव देशमुख म्हणाले, गेली 50 वर्षे आपणमला प्रे, आशिर्वाद दिले व निवडून दिले याची माझ्या अंत:करणातनोंद आहे. टेंभूचे पाणी बुध्देहाळ तलावात आले असून येत्या दोनमहिन्याच्या कालावधीत जुनोनी परिसराला हे पाणी मिळण्यासाठीआपला प्रयत्न चालु आहे. म्हैसाळचे पाणी वाढेगाव बंधार्‍यापर्यंतपोहचले आहे. शाखा क्र.5 चे पाणी माण नदीपर्यंत आले आहे, याचामला आनंद आहे. नजीकच्या काळात दुष्काळाचे निर्मुलन करूनजनतेला दिलासा देणार आहे. ही माझी शेवटची निवडणूक आहे.शेवटचा श्वास असेपर्यंत आपली सेवा करत राहणार आहे. यातालुक्यातील दुष्काळ हटविल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाहीत्यांनी दिली. आपले अनमोल मत देऊन मला प्रचंड मताने निवडूनद्या व आशिर्वाद द्या, असे आवाहन शेवटी त्यांनी केले.यावेळी प्रा.लक्ष्मण हाके म्हणाले, महाराष्ट्राचे आदर्श नेतृत्वआ.गणपतराव देशमुख आहेत. विधानसभेला त्यांच्या मार्गदर्शनाचीगरज आहे. 2003 साली राज्यपालांनी त्यांच्या कार्याचा गौरव केलाहोता. शेतकर्‍यांचे हित पाहणारा नेता आहे. त्यांना तालुक्यातीलमतदारांनी प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन केले.यावेळी प्रा.माणिक पाटील म्हणाले, तालुक्याला पाणीमिळविण्यासाठी आ.गणपतराव देशमुख यांनी अविरत परिश्रम घेतलेआहेत. सांगोला मतदार संघाची मुलासारखी चांगली राखण करणारादेवमाणूस आहेत. अनेक नेते पक्ष निष्ठा बाजूला ठेवून तिकीटमिळविण्यासाठी बेडूक उड्या मारत असतात. आ.देशमुख हे मतदारसंघाची कळकळ असणारा माणूस आहे. निवडणुका विकासासाठीअसतात हा त्यांचा संदेश आहे. एकच झेंडा, एकच पक्ष, जनतेचीनिष्ठा जपणारा नेता आहे. 50 वर्षात तालुक्यातील जनतेने जेवढे प्रेदेऊन निवडून दिले असा महाराष्ट्रात एकही आमदार सापडणार नाही.पाण्यासाठी त्यांनी जिवन खर्च केले आहे. त्यांना प्रचंड मताधिक्यानेनिवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी चंद्रकांतदादा देशमुख व इतर मान्यवरांनी आपली मनोगतेव्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड.सचिन देशमुख यांनी केले.उपस्थितांचे आभार गजेंद्र कोळेकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठीतालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते,पं.स.सदस्य, सभापती इत्यादी मान्यवरांनी उपस्थित लावली होती.फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी जल्लोषात आ.गणपतरावदेशमुख यांचे स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा लोकांची प्रचंड गर्दीहोती. जागा अपूरी पडत होती. लोक उभा राहून भाषण ऐकत होते.

Comments

Popular posts from this blog

आमदार गणपतराव देशमुख व सौ. रतनबााई गणपतराव देशमुख यांनी भोपळे रोडवर शाळेतील मतदानकेंद्रात मतदान केले.

शेतकरी कामगार पक्षाच्यामहिला आघाडीच्याप्रचारास उत्स्फुर्त प्रतिसाद

विकासाच्या मुद्यावर केले जाणारेराजकारण टिकणारे-आ.देशमुख