टँकर तातडीने सुरू करा :आ. गणपतराव देशमुख
सांगोला-पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शासनाने गांभिर्याने घेतला आहे. यासाठी शासन पैसा खर्च करते, पिण्याच्या पाण्याची जबाबदारी सरपंच-ग्रामसेवकांची असून पाणी टंचाईची एकत्रित पाहणी करून संबंधित अधिकार्यांनी टँकरचा प्रस्ताव प्रांताधिकार्यांकडे पाठविल्यानंतर एक आठवड्यात टँकर सुरू झाले पाहिजेत, असे आदेश आ. गणपतराव देशमुख यांनी दिले. सांगोला येथे पंचायत समिती बचत भवनात टंचाई आढावा बैठकीत अध्यक्ष पदावरून आ. देशमुख बोलत होते.या बैठकीस आ. दीपक साळुंखे-पाटील, सभापती ताई मिसाळ, उपसभापती पांडुरंग पांढरे, चंद्रकांत देशमुख, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, पं.स. सदस्या यमगर, सूर्यगण, सुनील चौगुले, सुबराव बंडगर, हणमंत बंडगर, नवनाथ पवार, शहाजी नलवडे, पांडुरंग जाधव आदी उपस्थित होते.पुढे बोलताना आ. देशमुख म्हणाले, जेथे पाणीपुरवठा योजना राबविण्याची गरज आहे, त्या गावामध्ये शौचालय योजना प्राधान्याने राबवावी. ग्रामपंचायतीने गावातील पाणंद रस्ते रोजगार हमीतून येत्या पावसाळ्यापर्यंत करून घ्यावेत. प्रशासनाने छावणी चालकांची ऑगस्ट-सप्टेंबर २0१३ अखेर पर्यंतची बिले ७ दिवसात अदा करावीत, गावातील रस्त्याच्या कामाचा आढावा ८ दिवसात सादर करावा. जीवन प्राधिकरणाने शिरभावी पाणीपुरवठा योजनेची गळती ५ टक्क्यापर्यंत आणण्याचा प्रयकरावा. विंधन विहिरी बंद आहेत त्या दुरूस्त करण्यासाठी पंचायत समिती फंडातून खर्च करावा. यावेळी आ. साळुंखे-पाटील म्हणाले, गावागावातील पाणीटंचाईवर ग्रामसेवक-तलाठी यांनी लक्ष देऊन टँकर मागणी प्रस्ताव त्वरित सादर करावा. ५0 विंधन विहिरी बंद आहेत त्या सुरू करण्याबाबत नियोजन करावे. इटकी पाणीपुरवठय़ाबाबत जीवन प्राधिकरणाने लक्ष घ्यावे. गारपीट झालेल्या भागातील जे नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत त्या शेतकर्यांचा संबंधित अधिकार्यांनी विचार करावा. या आढावा बैठकीस सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment