भविष्यात परिवर्तन होईलच : गणपतराव देशमुख
सांगोला (जि. सोलापूर) तालुक्याचे आमदार गणपतराव देशमुख यांच्या विधिमंडळातील कामगिरीस 15 मार्च रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांनी या पाच दशकांतील सामाजिक, राजकीय बदल मांडताना आपल्या आठवणींनाही उजाळा दिला...
- विधिमंडळातील तुमच्या कामगिरीस पन्नास वर्षे पूर्ण झाली. तुमच्या राजकीय जीवनाची सुरवात केव्हा झाली?
- माझा जन्म 10 ऑगस्ट 1927चा. माझा स्वातंत्र्यपूर्व काळात विद्यार्थी चळवळीत सहभाग होता. मी 1942च्या सत्यागृहातही होतो. माझं गाव पेण्णूर (सोलापूर). माझं गाव सत्याग्रही तुळशीदास जाधव यांना मानणारं. ते कॉंग्रेसचे. मात्र 1948 मध्ये शेतकरी कामगार पक्षात गेले. त्यांच्याबरोबर गावातले सारेच शेकापमध्ये गेले. मी 1950 ते 56 या कालावधीत पुण्यातून बी.ए. व एलएल.बी. पूर्ण केलं. तिथेही आम्ही विद्यार्थी चळवळ सुरू केली. तिथेच माझ्या व्यापक समाजकारणाचा आणि राजकारणाचा पाया रचला गेला.
- तुमच्या जडणघडणीत कोणाकोणाचा प्रभाव पडला?
त्या वेळी मी मार्क्सवादी विचाराने भारावून गेलो. एस. एम. पाटील, शंकरराव मोरे, कमलाताई भागवत, वसंतराव तुळपुळे यांचा माझ्यावर प्रभाव होता.
- आपण शेतकरी, शेतमजूर, दलित, कष्टकरी जनता यांच्याविषयी बोलता, त्याचं मूळ कशात आहे?
मी शेतकरी कुटुंबात वाढलो, त्यामुळे शेती आणि शेतकरी यांच्याविषयी ओढ निर्माण झाली होती. ती पुढे आयुष्यभर कायम राहिली. त्यामुळेच राजकीय जीवनात प्रलोभने येऊनही कधी विचलित झालो नाही. सत्तेची अगर पदाची कधी अभिलाषा मनाला शिवली नाही. तत्त्वाचं राजकारण करताना त्रास झाला नाही. मी सांगोल्यातून 1962 मध्ये प्रथम निवडणूक लढवली. तिथून आतापर्यंत दहा वेळा निवडून आलो. अपवाद केवळ 1971 चा. मात्र, पोटनिवडणुकीत जिंकलो. त्यानंतर 1995 ते 1995 या काळात विधिमंडळात नव्हतो. त्या वेळी माझा 192 मतांनी पराभव झाला. त्या वेळी गाफील राहण्याची चूक भोवली; पण पुढील निवडणुका सातत्याने जिंकता आल्या. मी यशवंतरावांपासून ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत सर्व मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत विधिमंडळ कामकाजात भाग घेतला आहे. अपवाद फक्त मनोहर जोशी यांचा. तर, त्याचं असं झालं.
- आपण इतकी वर्षे आमदार आहात. या काळात बरीच स्थित्यंतरं झाली. मतदार तुम्हाला कसे आपणास स्वीकारतात?
मला एकाच कुटुंबातील आजोबा, वडील आणि मुलं या तीन पिढ्यांनी निवडून दिलं. या तीन पिढ्या आजही माझ्यामागे खंबीरपणे उभ्या आहेत. 1972पासून तालुक्यातील पंचायत समिती, महत्त्वाच्या संस्था शेकापच्या ताब्यात आहेत. याचं एकमेव कारण म्हणजे लोकांत मिसळणे, त्यांचे प्रश्न समजावून घेणे.
- पन्नास वर्षांत काय बदल झालाय?
आमची पिढी एका विचाराने भारलेली होती. पहिल्या निवडणुकी वेळी मी एक जीप प्रचारासाठी भाड्याने घेतली होती; मात्र लोक ती वापरत नव्हते. ते सायकलवरून आणि पायी प्रचार करत. तो काळ आता राहिला नाही. मात्र, 1980 पासून बदल होऊ लागले. मूल्याधारित राजकारणाचा पाया ढासळू लागला. आता तर निवडणुका लढवणंच अवघड झालंय; पण मी तालुक्यातील सामान्य जनतेच्या गरजा डोळ्यांसमोर ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न केले. शेती, पाणी, दुष्काळ, जनावरे, चाराटंचाई याकडे विशेष लक्ष देण्याचा, बेरोजगारी हटविण्याचा प्रयत्न केला.
- आपला दिनक्रम कसा असतो?
- रोज सकाळी चालतो. अलीकडे मी नेमाने रविशंकर यांचे योग करतो, त्याचा खूप फायदा झाला. मराठीतील दोन-तीन प्रकाशनांनी आत्मचरित्र लिहा, असं मला सांगितलं. मला ते लिहिणं आवडत नाही, त्यामुळे निरीक्षणे, अनुभव लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.
- आपलं कोणतं स्वप्न पूर्ण व्हावं असं वाटतं?
आज डाव्या चळवळीची थोडीशी पीछेहाट झाली असली, तरी एक दिवस परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, अशी माझी दृढ श्रद्धा आहे. सांगोला तालुक्याचा आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे; मात्र अजून शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही योजना मार्गी लागल्या आहेत. काही योजनांसाठी केंद्र व राज्य शासनाचा निधी मंजूर झाला आहे. सांगोल्याला शेतीसाठी पाणी मिळावं, हे माझं स्वप्न आहे.
- विधिमंडळातील तुमच्या कामगिरीस पन्नास वर्षे पूर्ण झाली. तुमच्या राजकीय जीवनाची सुरवात केव्हा झाली?
- माझा जन्म 10 ऑगस्ट 1927चा. माझा स्वातंत्र्यपूर्व काळात विद्यार्थी चळवळीत सहभाग होता. मी 1942च्या सत्यागृहातही होतो. माझं गाव पेण्णूर (सोलापूर). माझं गाव सत्याग्रही तुळशीदास जाधव यांना मानणारं. ते कॉंग्रेसचे. मात्र 1948 मध्ये शेतकरी कामगार पक्षात गेले. त्यांच्याबरोबर गावातले सारेच शेकापमध्ये गेले. मी 1950 ते 56 या कालावधीत पुण्यातून बी.ए. व एलएल.बी. पूर्ण केलं. तिथेही आम्ही विद्यार्थी चळवळ सुरू केली. तिथेच माझ्या व्यापक समाजकारणाचा आणि राजकारणाचा पाया रचला गेला.
- तुमच्या जडणघडणीत कोणाकोणाचा प्रभाव पडला?
त्या वेळी मी मार्क्सवादी विचाराने भारावून गेलो. एस. एम. पाटील, शंकरराव मोरे, कमलाताई भागवत, वसंतराव तुळपुळे यांचा माझ्यावर प्रभाव होता.
- आपण शेतकरी, शेतमजूर, दलित, कष्टकरी जनता यांच्याविषयी बोलता, त्याचं मूळ कशात आहे?
मी शेतकरी कुटुंबात वाढलो, त्यामुळे शेती आणि शेतकरी यांच्याविषयी ओढ निर्माण झाली होती. ती पुढे आयुष्यभर कायम राहिली. त्यामुळेच राजकीय जीवनात प्रलोभने येऊनही कधी विचलित झालो नाही. सत्तेची अगर पदाची कधी अभिलाषा मनाला शिवली नाही. तत्त्वाचं राजकारण करताना त्रास झाला नाही. मी सांगोल्यातून 1962 मध्ये प्रथम निवडणूक लढवली. तिथून आतापर्यंत दहा वेळा निवडून आलो. अपवाद केवळ 1971 चा. मात्र, पोटनिवडणुकीत जिंकलो. त्यानंतर 1995 ते 1995 या काळात विधिमंडळात नव्हतो. त्या वेळी माझा 192 मतांनी पराभव झाला. त्या वेळी गाफील राहण्याची चूक भोवली; पण पुढील निवडणुका सातत्याने जिंकता आल्या. मी यशवंतरावांपासून ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत सर्व मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत विधिमंडळ कामकाजात भाग घेतला आहे. अपवाद फक्त मनोहर जोशी यांचा. तर, त्याचं असं झालं.
- आपण इतकी वर्षे आमदार आहात. या काळात बरीच स्थित्यंतरं झाली. मतदार तुम्हाला कसे आपणास स्वीकारतात?
मला एकाच कुटुंबातील आजोबा, वडील आणि मुलं या तीन पिढ्यांनी निवडून दिलं. या तीन पिढ्या आजही माझ्यामागे खंबीरपणे उभ्या आहेत. 1972पासून तालुक्यातील पंचायत समिती, महत्त्वाच्या संस्था शेकापच्या ताब्यात आहेत. याचं एकमेव कारण म्हणजे लोकांत मिसळणे, त्यांचे प्रश्न समजावून घेणे.
- पन्नास वर्षांत काय बदल झालाय?
आमची पिढी एका विचाराने भारलेली होती. पहिल्या निवडणुकी वेळी मी एक जीप प्रचारासाठी भाड्याने घेतली होती; मात्र लोक ती वापरत नव्हते. ते सायकलवरून आणि पायी प्रचार करत. तो काळ आता राहिला नाही. मात्र, 1980 पासून बदल होऊ लागले. मूल्याधारित राजकारणाचा पाया ढासळू लागला. आता तर निवडणुका लढवणंच अवघड झालंय; पण मी तालुक्यातील सामान्य जनतेच्या गरजा डोळ्यांसमोर ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न केले. शेती, पाणी, दुष्काळ, जनावरे, चाराटंचाई याकडे विशेष लक्ष देण्याचा, बेरोजगारी हटविण्याचा प्रयत्न केला.
- आपला दिनक्रम कसा असतो?
- रोज सकाळी चालतो. अलीकडे मी नेमाने रविशंकर यांचे योग करतो, त्याचा खूप फायदा झाला. मराठीतील दोन-तीन प्रकाशनांनी आत्मचरित्र लिहा, असं मला सांगितलं. मला ते लिहिणं आवडत नाही, त्यामुळे निरीक्षणे, अनुभव लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.
- आपलं कोणतं स्वप्न पूर्ण व्हावं असं वाटतं?
आज डाव्या चळवळीची थोडीशी पीछेहाट झाली असली, तरी एक दिवस परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, अशी माझी दृढ श्रद्धा आहे. सांगोला तालुक्याचा आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे; मात्र अजून शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही योजना मार्गी लागल्या आहेत. काही योजनांसाठी केंद्र व राज्य शासनाचा निधी मंजूर झाला आहे. सांगोल्याला शेतीसाठी पाणी मिळावं, हे माझं स्वप्न आहे.
Comments
Post a Comment