ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा विकास झाला पाहिजे- आमदार देशमुख


ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा विकास झाला पाहिजे- आमदार देशमुख
 सांगोला (प्रतिनिधी) :- शेकापक्ष हा कष्टकरी, शेतमजूर, दलित, बारा बलुतेदार, लहान व्यापारी, शेतकरी यांची बाजू घेणारा पक्ष आहे, ग्रामीण भागामध्ये दोन तृतीयांश जनता राहते. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या विकास झाल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही. गेली 50 वर्षे ग्रामीण भागाचे प्रश्न घेवूनच काम केले. शेतकर्‍यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे कष्टकरी जनतेच्या मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, चळवळी केल्या. शेेेेेतकर्‍यांना 2000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे अशी आपली मागणी आहे. असे विचार शेकापचे ज्येष्ठे नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केले.
सांगोला तालुक्यातील आगलावेवाडी, भोपसेवाडी, डिकसळ, पारे, गावडेवाडी आणि तरंगेवाडी या गावच्या गावभेटीदरम्यान ग्रामस्थांबरोबर चर्चा करताना आम. देशमुख बोलत होते.

याप्रसंगी आम. देशमुख म्हणाले की, 1962 पासून मला 52 वर्षे निवडून दिले आहे. 10 वेळा आमदार केले आहे, मंत्री केले आहे. यावेळी तुम्हीच मला उभे केले आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी निवडणूक लढवित आहे. ही शेवटी महत्वाची निवडणूक आहे. शिरभावी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी हे पाणी वाड्यावस्त्यांवर न्यायचे आहे. सांगोला तालुक्यात शेकापक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्ष-चळवळ आंदोलनाच्या जोरावर कृष्णेचे पाणी म्हैसाळ व टेंभू प्रकल्पातून तालुक्यात आले आहे. हे बांधावर आलेले शेतीचे पाणी शेतकर्‍यांच्या शेतात नेण्याचे काम आपणास कार्यकर्त्यांच्या बळावर करावयाचे आहे.
निवडणूक ही पक्ष बदलण्यासाठी नसते त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता लोकप्रतिनिधी काय करतो हे दोन्ही डोळ्याचा पहारा देवून पहात असतो याची जाणीव मला आहे. या गावभेट दौर्‍यात आम. देशमुख यांनी वीजेच्या बिलाची माफी, अन्न सुरक्षा कायदा, दुष्काळी स्थितीमध्ये केलेल्या कामाचा आढावा घेतला. या दौर्‍यात जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख, सभापती सुरेखा सुर्यगंध, उपसभापती सुनिल चौगुले, नगराध्यक्ष नवनाथ पवार, महेश बंडगर, सचिव प्रा. विठ्ठल शिंदे यांनी विचार मांडले. याप्रसंगी सुमन यमगर, सविता रुपनर उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

आमदार गणपतराव देशमुख व सौ. रतनबााई गणपतराव देशमुख यांनी भोपळे रोडवर शाळेतील मतदानकेंद्रात मतदान केले.

शेतकरी कामगार पक्षाच्यामहिला आघाडीच्याप्रचारास उत्स्फुर्त प्रतिसाद

विकासाच्या मुद्यावर केले जाणारेराजकारण टिकणारे-आ.देशमुख