आमदार गणपतराव देशमुख हे 100 नंबरी सोने- हाजी शब्बीरभाई खतीब
आमदार गणपतराव देशमुख हे 100 नंबरी सोने- हाजी शब्बीरभाई खतीब
सांगोला (प्रतिनिधी) :- मी देशमुख साहेबांचा गेल्या 40 वर्षांपासून समर्थक आहे. सांगोला शहर आणि तालुक्याचा चौफेर विकास केवळ आमदार गणपतराव देशमुख यांच्यामुळेच झाला आहे. दूरदृष्टीने आम. देशमुख यांनी पंढरपूरहून चंद्रभागेचे पाणी आणून सांगोला शहराची तहान भागविली आहे. शेतीच्या पाण्याचे आम. देशमुख यांचे स्वप्न 50 टक्के पूर्ण झाले आहे. बांधावर आलेले शेतीचे पाणी शेतात नेण्याचे नियोजन त्यांचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. सांगोला शहरात 100 पेक्षा जास्त ज्वेलर्स दुकाने आहेत. शहराचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. 40 टक़्केपेक्षा जास्त लोक तालुक्याबाहेरील उद्योगधंदा, नोकरीच्या निमित्ताने शहरात स्थायिक आहेत. याचे कारण शहराचा चौफेर विकास व शहरात असलेली शांतता. आम. देशमुख यांनी सर्वधर्मसमभाव राबविला. सांगोला शहराच्या शांततेचा पाया आम. देशमुख यांनी घातला. त्यामुळे रुपनर बंधूनी आपले उद्योग सुरु केले. चुक करणाराची बाजू आम. देशमुख यांनी कधीही मांडली नाही. शहराची शांतता, सुव्यवस्था अबाधित राहण्यावसाठी व सर्वांच्या भल्यासाठी आ. देशमुख यांनाच विजयी करावे असे आवाहन हाजी शब्बीरभाई खतीब यांनी केले आहे. नुकत्याच झालेल्या मुजावर गल्लीतील सभेत त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.
सांगोला (प्रतिनिधी) :- मी देशमुख साहेबांचा गेल्या 40 वर्षांपासून समर्थक आहे. सांगोला शहर आणि तालुक्याचा चौफेर विकास केवळ आमदार गणपतराव देशमुख यांच्यामुळेच झाला आहे. दूरदृष्टीने आम. देशमुख यांनी पंढरपूरहून चंद्रभागेचे पाणी आणून सांगोला शहराची तहान भागविली आहे. शेतीच्या पाण्याचे आम. देशमुख यांचे स्वप्न 50 टक्के पूर्ण झाले आहे. बांधावर आलेले शेतीचे पाणी शेतात नेण्याचे नियोजन त्यांचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. सांगोला शहरात 100 पेक्षा जास्त ज्वेलर्स दुकाने आहेत. शहराचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. 40 टक़्केपेक्षा जास्त लोक तालुक्याबाहेरील उद्योगधंदा, नोकरीच्या निमित्ताने शहरात स्थायिक आहेत. याचे कारण शहराचा चौफेर विकास व शहरात असलेली शांतता. आम. देशमुख यांनी सर्वधर्मसमभाव राबविला. सांगोला शहराच्या शांततेचा पाया आम. देशमुख यांनी घातला. त्यामुळे रुपनर बंधूनी आपले उद्योग सुरु केले. चुक करणाराची बाजू आम. देशमुख यांनी कधीही मांडली नाही. शहराची शांतता, सुव्यवस्था अबाधित राहण्यावसाठी व सर्वांच्या भल्यासाठी आ. देशमुख यांनाच विजयी करावे असे आवाहन हाजी शब्बीरभाई खतीब यांनी केले आहे. नुकत्याच झालेल्या मुजावर गल्लीतील सभेत त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment